Posts

Showing posts from December, 2024

ओम विश्वरुपाय नमः

Image
 लाडकी माणसे भेटून जातात ती काही आपल्या आयुष्यात टिकत नाहीत. पण नको ते वाहियात आणि निरर्थक लोक उगाच आपल्या उरावर चीटकून असतात.  एकतर हे असे असते किंवा आपल्या दृष्टीत काही गोष्टी येत नाहीत आणि आपण अजाण रहातो.  बरं, आपण स्वतः प्रामाणिक राहण्याचा, प्रेमळ आणि निस्वार्थ भावनांचा कितीही सत्कार केला, तरी आयुष्यात नको तेच होते, नको त्याच माणसांत आपण अडकतो. इतर कुणालाही आपल्या सारखे भाबडे, प्रेमळ, सालस वगैरे रहाण्यात काहीच रुची नसते. त्यांना जगाने चांगलेच चतुर, हरामी, निर्दयी वगैरे बनवून टाकलेले असते.  मग आपण स्वतःस मूर्ख ठरवून गप बसावे की आणि काही करायचे -- हा अत्यंत भांडावून सोडणारा प्रश्न.  मग एके दिवशी आपल्यालाच आपले समजते की - १. आपला मूळचा स्वभाव काही आपण बदलू शकत नाही, कारण तो अनेक प्रभाव आणि घटकांनी घडलेला असतो. २. आपण आपल्या मूळ स्वभावाशी प्रामाणिक रहाणे अत्यंत गरजेचे असते. खरे म्हणजे स्वभाव सोडून इतर काही करणे शक्यच नसते.  ३. म्हणूनच आपण स्वतःचा स्वभाव, प्रकृती, अंतरमन, आणि संस्कार - यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. त्या सन्मान भावनेत हे सुद्धा माहीत असले पाह...